परिचय

जयहिंद लोकचळवळ

महात्मा गांधींनी भारतीय समाजाला जीवनमूल्ये, नीतिमूल्ये आणि राष्ट्रीय एकता यांचे महत्त्व शिकवले. त्यांनी तुकड्यात विभागलेल्या समाजाला एकसंघ करण्याचे महान कार्य केले आणि सत्य व अहिंसेचा नवा मार्ग दाखवला.

आजच्या काळात जगभर वैमनस्य वाढत आहे. काही शक्ती जाणूनबुजून धर्म, राष्ट्रवाद आणि इतर मुद्द्यांवर माणसामाणसात फूट पाडत आहेत. हिंसा, सत्तेचा गैरवापर आणि पर्यावरणाविषयीची बेफिकिरी समाजाला दुर्बल करत आहे.

या परिस्थितीत आपण तटस्थ राहू शकत नाही. समाजातील सुज्ञ नागरिकांनी एकत्र येऊन या समाजविघातक प्रवृत्तींचा विरोध करणे गरजेचे आहे. महात्माजींच्या विचारांनी प्रेरित होऊन सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने आपण हा संघर्ष यशस्वी करू शकतो. ‘जयहिंद लोकचळवळ’ ही गांधीजींच्या शिकवणीचा वारसा पुढे नेत समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करत आहे. आपणही या चळवळीत सामील होऊन परिवर्तनाचा भाग बनूया! जय हिंद!

आपली लोकशाही ही समाजाच्या हितासाठी उपयुक्त आहे. ‘जयहिंद युवा चळवळ ‘ही अशीच एक चळवळ आहे जी समाजाच्या उन्नतीसाठी वाहिलेली आहे.

- डॉ सुधीरजी तांबे.

आनंद म्हणजे जेव्हा आपण काय विचार करता, आपण काय म्हणता आणि आपण जे करता ते सुसंगत असते - महात्मा गांधी