जागर लोकशाहीचा, निर्धार तरूणांचा,
संकल्प सुदृढ समाजाचा.



आमच्या विषयी
महात्मा गांधींनी भारतीय समाजाला जीवन मूल्ये, नीतिमूल्ये व राष्ट्रीय मूल्ये शिकवली
महात्मा गांधींनी भारतीय समाजाला जीवनमूल्ये, नीतिमूल्ये आणि राष्ट्रीय एकता यांचे महत्त्व शिकवले. त्यांनी तुकड्यात विभागलेल्या समाजाला एकसंघ करण्याचे महान कार्य केले आणि सत्य व अहिंसेचा नवा मार्ग दाखवला. आजच्या काळात जगभर वैमनस्य वाढत आहे. काही शक्ती जाणूनबुजून धर्म, राष्ट्रवाद आणि इतर मुद्द्यांवर माणसामाणसात फूट पाडत आहेत. हिंसा, सत्तेचा गैरवापर आणि पर्यावरणाविषयीची बेफिकिरी समाजाला दुर्बल करत आहे. या परिस्थितीत आपण तटस्थ राहू शकत नाही. समाजातील सुज्ञ नागरिकांनी एकत्र येऊन या समाजविघातक प्रवृत्तींचा विरोध करणे गरजेचे आहे. महात्माजींच्या विचारांनी प्रेरित होऊन सत्य आणि अहिंसेच्या मार्गाने आपण हा संघर्ष यशस्वी करू शकतो. ‘जयहिंद लोकचळवळ’ ही गांधीजींच्या शिकवणीचा वारसा पुढे नेत समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करत आहे. आपणही या चळवळीत सामील होऊन परिवर्तनाचा भाग बनूया! जय हिंद!
आमचे कार्यरत प्रकल्प
आमचे कार्यरत प्रकल्प
अध्यक्ष संदेश
डॉ. सुधीरजी तांबे अध्यक्ष जयहिंद लोकचळवळ
समाजात जाणीवपूर्वक धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणाऱ्या विघातक प्रवृत्तींचा विरोध करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. समाज एकसंघ राहिला, तरच शांतता आणि समृद्धी नांदू शकते. जेथे नागरिक एकत्रितपणे नांदतात, एकमेकांवर विश्वास ठेवतात आणि संवाद साधतात, तेथे मतभेदही चर्चा आणि न्यायाच्या मार्गाने सोडवले जातात. विविध भाषा, धर्म आणि परंपरा असलेल्या समाजातील माणसे परस्परांचा आदर करतात, त्यांच्या संस्कृतीप्रती जिव्हाळा आणि प्रेम बाळगतात.
भारतीय संस्कृती ही सर्वसमावेशक असून, संतांनी दिलेल्या विश्वबंधुत्वाच्या शिकवणीवर आधारित आहे. सर्वसामान्य जनता धर्म, जात किंवा भाषेच्या संकुचित चौकटीत अडकत नाही. अन्यथा, महाराष्ट्राचा शिवाजी गायकवाड उर्फ रजनीकांत तामिळ जनतेच्या हृदयावर राज्य करू शकला नसता. अशा असंख्य उदाहरणांमधून समाजातील व्यापक स्वीकाराचा संदेश मिळतो. धर्म, जात आणि प्रदेशाचा अभिमान असावा, पण त्याचा अहंकार होऊ नये किंवा त्यातून द्वेषाची भावना निर्माण होऊ नये.
आज जगभर स्वार्थासाठी द्वेष आणि मत्सर पसरवला जात आहे, ज्यामुळे संपूर्ण मानवजातीचे नुकसान होत आहे. “Eye for an eye makes the whole world blind” ही शिकवण विसरता कामा नये. समाजाने या विघातक विचारांना थारा न देता, एकोपा आणि बंधुभाव वाढवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. एकतेतच आपली खरी ताकद आहे!
जयहिंद लोकचळवळ
आपली लोकशाही ही समाजाच्या हितासाठी उपयुक्त आहे. ‘जयहिंद युवा चळवळ ‘ही अशीच एक चळवळ आहे जी समाजाच्या उन्नतीसाठी वाहिलेली आहे.
जयहिंद लोकचळवळ ही केवळ एक सेवाभावी संस्था नसून ही लोकचळवळ आहे. सुदृढ समाज निर्मितीच्या निर्धाराने सर्व वयोगटाच्या स्त्री-पुरुषांना संघटित करून, त्यांच्या सहाय्याने लोकांना बरोबर घेऊन हे स्वप्न पूर्ण करायचे आहे. सुदृढ निरोगी निकोप समाज हा राष्ट्राचा पाया असतो, हा पाया भक्कम असेल तरच राष्ट्र सामर्थ्यवान व प्रगत बनते. हा पाया कच्चा असेल तर राष्ट्र कमकुवत राहते.
People Directly
People Indirectly
States
Projects
मान्यवरांचे बोल


“जयहिंद लोकचळवळीचं काम तरुणांना एक नवीन दिशा देतंय, त्यांना स्वप्न पाहण्याची आणि ते पूर्ण करण्याची शक्ती देतंय.”


“पद, पैसा, बुद्धिमत्ता यांचे मूल्य नाही, तर आपण ज्या लोकांसोबत काम करतो त्यांची संख्याच मूल्यवान आहे. एकत्रितपणे काम केले तरच खेडेगाव संपन्न होईल.”


“शेतकऱ्यांना आपल्या जमिनीची काळजी घेण्यासाठी आणि त्याची सुपीकता वाढवण्यासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे.”
मान्यवरांचे बोल

“जयहिंद लोकचळवळीचं काम तरुणांना एक नवीन दिशा देतंय, त्यांना स्वप्न पाहण्याची आणि ते पूर्ण करण्याची शक्ती देतंय.”

“पद, पैसा, बुद्धिमत्ता यांचे मूल्य नाही, तर आपण ज्या लोकांसोबत काम करतो त्यांची संख्याच मूल्यवान आहे. एकत्रितपणे काम केले तरच खेडेगाव संपन्न होईल.”

“शेतकऱ्यांना आपल्या जमिनीची काळजी घेण्यासाठी आणि त्याची सुपीकता वाढवण्यासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे.”
महात्मा गांधींचे विचार
चांगल्या बदलाची सुरूवात आधी स्वत:पासून करा. महात्मा गांधी
जयहिंद कशासाठी ?
एक सुदृढ़ समाज आपली न्यायप्रियता, समंजसपणा आणि सदसदविवेकबुद्धि जागृत ठेवतो
जयहिंद लोकचळवळ हे सुदृढ समाज निर्मितीचे लोकअभियान आहे. सुदृढ समाज हा प्रगत राष्ट्राचा पाया असतो. समाज सुदृढ असेल तरच ते राष्ट्र महान बनते, मात्र समाज सुदृढ नसेल तर देश कमकुवत व दुर्बल राहतो. अशा राष्ट्राला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष इतरांच्या गुलामगिरीत राहावे लागते.