क्रीडा

जयहिंद क्रीडा मंच
सामाजिक आरोग्यासाठी क्रीडा — एक प्रभावी मार्ग क्रीडा ही केवळ शारीरिक व्यायामाची साधनं नसून ती व्यक्तीच्या मानसिक आरोग्याचा आणि सामाजिक ऐक्याचा आधारस्तंभ आहे. खेळल्याने केवळ शरीर तंदुरुस्त राहतं असं नाही, तर मनही सुदृढ होतं. क्रीडांगणावर जाती, धर्म, वर्ग, वय या सगळ्या सामाजिक भेदांची भिंत आपोआप गळून पडते. पराभव पचवण्याची आणि विजय नम्रपणे स्वीकारण्याची शिकवण, संयम, शिस्त, संघभावना, आणि एकमेकांच्या यशाला दाद देण्याची सवय ही क्रीडांगणावरच मिळते. जयहिंद लोकचळवळ समाजात या सकारात्मक बदलासाठी क्रीडाक्षेत्राकडे विशेष लक्ष देत आहे. युवकांमध्ये वाढती बेरोजगारी आणि त्यामुळे आलेली वैफल्यग्रस्तता, व्यसनाधीनता यावर मात करण्यासाठी क्रीडा हाच एक योग्य मार्ग आहे. स्पर्धांचे आयोजन, गुणवंतांना पुढील प्रशिक्षणाची संधी आणि समाजामध्ये आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याचा आमचा संकल्प आहे.
उपक्रम
- क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले जाते.
- उन्हाळी व हिवाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातात.
- युवतींसाठी संरक्षण प्रशिक्षण वर्ग घेतले जातात.
- यशस्वी खेळाडूंना पुरस्कार देऊन सन्मान केला जातो.
- ग्रामीण भागात गायरान जमिनीवर क्रीडांगणांची निर्मिती करणे.
- गावोगावी मुला-मुलींसाठी स्पोर्ट्स क्लब स्थापन केले आहेत.
- सॅटरडे / संडे क्लब द्वारे ग्रामीण भागातील खेळाडूंना शनिवार /रविवार एकत्र आणून प्रशिक्षण दिले जाते.